ऊसामध्ये लावलेला 15 किलो वजनाचा गांजा जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई.



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - करवीर तालुक्यातील शेळकेवाडी येथील जयदिप यशवंत शेळके (वय 42) याच्या कडुन शेतात लावलेला 15 कि. वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी अवैद्य अंमली पदार्थांचा साठा आणि विक्री व शेती करीत असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

वरिष्ठांनी दिलेल्या सुचने प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तपास पथके तयार करून रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना पोलिस अंमलदार वैभव पाटील  यांना माहिती मिळाली की ,करवीर तालुक्यातील शेळकेवाडी ते वाशी रोडवरील विठ्ठलाई परिसरात असलेल्या ऊसाच्या शेतात एका इसमाने  गांजाच्या झाडाची लागवड केल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी आपल्या पोलिस पथकासह सदर  ठिकाणी जाऊन (दि.17 एप्रिल 25 ) रोजी छापा टाकून जयदिप यशवंत शेळके याला ताब्यात घेऊन त्याच्या ऊसाच्या शेतात गांजाची लावलेली काही झाडे आढ़ळल्याने त्याच्याकडील एकूण 15 किलो.वजनाचा ओला गांजा  व इतर साहित्य असा एकूण एक  लाख 50 हजार 500/  रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर करवीर  पोलिस ठाण्यात  एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला पुढ़ील तपासासाठी करवीर  पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव,पोलिस अंमलदार वैभव पाटील ,अरविंद पाटील,महेंद्र कोरवी, परशुराम गुजरे ,गजानन गुरव ,अशोक पोवार,राजू येडगे,योगेश गोसावी,प्रदिप पाटील,विशाल खराडे,शिवानंद मठपती,अमित सर्जे,नामदेव यादव,महादेव कुराडे,यशवंत कुंभार ,विशाल खराडे संतोष बर्गे आणि अमोल कोळेकर यांनी  केली.

Post a Comment

Previous Post Next Post