शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - करवीर तालुक्यातील  सांगरुळ येथील शेतकरी सुरेश दत्तात्रय नाळे (वय 46.रा.मेनरोड ,सांगरुळ) याने रविवार (दि.20 एप्रिल) रोजी रात्री दहाच्या सुमारास शेतातील जनावरांच्या शेड मध्ये असलेल्या लाकडी वाशाला नॉयलॉन दोरीने गळ्यात गळफास लावून घेतल्याने त्याच्या गळ्यातील गळफास सोडवून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

सुरेश शेतकरी असून आपल्या कुंटुबियासमवेत रहात होता.रविवारी रात्री शेताला पाणी पाजण्यासाठी जात असल्याचे घरी सांगून गेला होता.बराच वेळ झाल्याने सुरेश घरी परत कसा आला नाही म्हणून त्याचा लहान भाऊ बोलविण्यासाठी गेला असता सुरेश गळ्यात गळफास घेऊन लटकत असल्याचे पाहिले.त्याने याची माहिती तेथील पोलिस पाटील यांना दिली असता पोलिस पाटील यांनी घटना स्थळी येऊन पंचनामा करून त्याला  खाली उतवून त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.त्याच्या प श्च्यात आई,भाऊ ,पत्नी आणि एक मुलगा आहे.

त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Post a Comment

Previous Post Next Post