गांज्याची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांच्या कडुन 28 किलो.गांजा जप्त.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- गांज्याची विक्री करण्यासाठी आलेल्या निहाल इकबाल शेख (वय 27.रा.शिरपूर जि.धुळे) आणि चरण लालासो शिंदे (वय 32.रा.मान जि.सातारा) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून त्यांच्या कडील 5 लाख 60 हजार रुपये किमंतीचा 28 किलो वजनाचा गांजा जप्त करून त्यांना पुढ़ील तपासासाठी राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला कोल्हापुर जिल्ह्यासह शहरात अंमली पदार्थांच्या साठा करून विक्री करीत असलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या या अनुशंगाने माहिती घेऊन शोध घेत असताना राजाराम तलाव परिसरात दोघे जण गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून गुरुवार दि.(10) रोजी छापा टाकून दोघांना तीन  बँगेसह संशयीतरित्या थांबलेले दिसले असता त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करून बँगेची झडती घेतली असता त्यात 5 लाख 60 हजार रुपये किमंतीचा 28 किं.गांजा आणि 6500/ रु.किमंतीचे दोन मोबाईल व 2000/ रुपये रोख रक्कम असा 5 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर पोलिस उपनिरीक्षक चेतन मसुटगे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post