शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 4 थे, ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिकांच्या उपस्थित पार पडले.

 डॉ विक्रम शिंगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त ट्रस्टचा मोठ उपक्रम 


4 थे ,मराठी साहित्य संमेलन - अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भीमराव धुळुबुळु


प्रेस मीडिया लाईव्ह :

 बेडकिहाळ येथे 14 जुलै रोजी कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 4 थे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 14  रोजी देशभक्त  रत्नाप्पाना कुंभार सभागृह, बी.एस.कंपोजिट ज्युनिअर कॉलेज बेडकिहाळ येथे  हजारोंच्या उपस्थितीत उत्साहात कार्यक्रम  पार पडला. 

 कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मा. डॉ वाल्मिक वाघ सरवय्या व वावा प्रा लि कंपनी संस्थापक अध्यक्ष पुणे, यांच्या शुभहस्ते हस्ते हार घालून करन्यात आले. तेथुन ग्रंथ व पालखी पुजणाला सुरुवात झाली.  ग्रंथ व पालखी पुजण मा .  डॉ अशोक ठोमके, निर्वुत असिस्टंट मॅनेजर न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी, व सौ.अंजना ठोमके  यांच्या हस्ते करण्यात आले. तेथुन साहित्य नगरी पर्यंत  ग्रंथदिंडी पालखी बेडकिहाळ व परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीत हलगीच्या निनादात पालखी  मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर 

म.नि.प्र.अल्लमप्रभु महास्वामीजी, चिंचणी मठ, प्रवेशद्वार उद्घाटन प्रा डॉ अमर कांबळे अध्यक्ष नालंदा विद्यापीठ, इचलकरंजी यांच्या हस्ते करण्यात आले. स्व.सुनिल प्रभाकर पोतदार साहित्यनगरी उद्घाटन प्रा.वि.गो.वडेर ज्येष्ठ साहित्यिक, बेडकिहाळ  यांच्या हस्ते करण्यात आले. सहकाररत्न स्व.रावसाहेबदादा पाटील व्यासपीठ उद्घाटन डॉ. दिलीप कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. दिपप्रज्वलन मा.प्रा.डॉ.विजय धारवाड मा.विभागप्रमुख, कन्नड विभाग,जी आय बागेवाडी कॉलेज, निपाणी  तसेच ग्राम पंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले व  सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

भगवाण गौतम बुद्ध प्रतिमा पुजण मा. डॉ दिलीप नेवसे सावित्रीबाई फुले वंशज सातारा  यांच्या हस्ते, भगवाण महावीर प्रतिमेचे पूजन मा. प्रा डॉ गोपाल महामुणी मराठी विभाग प्रमुख श्रीमती कु.मिर्जी,महा, बेडकिहाळ 

 महात्मा बसवेश्वर प्रतिमेचे पूजन मा.जावेद ओदम उधोजक इचलकरंजी  संत ज्ञानेश्वर प्रतिमा पुजण मा.डॉ. नितीन गोंधळे, छ.शिवाजी महाराज प्रतिमा पुजण मा.शुभांगी शिंत्रे, राजर्षी छ. शाहू महाराज प्रतिमा पुजण मा.वैभव कांबळे ढोणेवाडी, म.ज्योतिबा फुले प्रतिमा पुजण दिलप्रीत सिंग उद्योजक इचलकरंजी , सावित्रीबाई फुले प्रतिमा पुजण डॉ महावीर पाटील चॉंद शिरदवाड, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा पुजण  डॉ अमोल खुरपे सिध्दार्थ हॉस्पिटल शमणेवाडी ,साहित्यिक आण्णाभाऊ साठे प्रतिमा पुजण मा.शकील मुजावर उधोजक इचलकरंजी या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

  कार्यक्रमाची सुरुवात कु. स्नेहा कांबळे यांच्या ईशस्तवन गिताने करन्यात आले. त्यानंतर स्वागत कै.बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विक्रम शिंगाडे यांनी केले. तर प्रास्ताविक मा.प्रा.प्रकाश कदम कोगनोळी यांनी केले. त्यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार डॉ. विक्रम शिंगाडे यांनी केला. 

   उद्दघाटक.प्रा.डॉ. विजय धारवाड माजी विभागप्रमुख कन्नड विभाग जी आय बागेवाडी कॉलेज निपाणी म्हणाले की कन्नड व मराठी कोणतीही भाषा असुदे भाषेवर प्रेम असले पाहिजे. भाषेविषयी तेड निर्माण करुन राजकारण करत बसु नये. सर्व भाषावंर आपले प्रेम असले पाहिजे. असे ते म्हणाले. कन्नड व मराठी भाषेमधील शब्दांचा जोड त्यांनी समजावून सांगितला.

  डॉ दिलीप कुलकर्णी.साहित्यिक, कुरुंदवाड म्हणाले की आधुनिक युगात साहित्य संमेलनाचे आयोजन करणे एवढे सोपे नाही. पण डॉ. विक्रम शिंगाडे यांनी आजच्या युवा पिढीला साहित्याची जाणीव व्हावी. म्हणून या मोठ्या साहित्य संमेलनाचे आयोजन केले. डॉ.विक्रम शिंगाडे सारखे प्रामाणिक लढाऊ कार्यकर्ता प्रत्येक गावा गावात असला पाहिजे. तसेच आज भाषा बांधव्य प्रत्येकाने जपले पाहिजे असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रा. भीमराव धुळुबुळु ज्येष्ठ साहित्यिक ,मिरज  म्हणाले की  आधुनिक युगात आपण जगताना कसे जगतो, ते फार महत्त्वाचे  बनत चालले आहे. साहित्य निर्माण करणार्यांना आता नवीन जगाची दिशा दिसु लागली आहे. साहित्य निर्मितीतील भाषेचा अडसर आता बाजूला पडत चालला आहे. युवावर्गाने नवनवीन साहित्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. व डॉ विक्रम शिंगाडे यांना म्हणाले की प्रत्येक साहित्य संमेलनाला आम्ही तुम्हाला मदत करु असे प्रतिपादन त्यांनी केले. 

   दुसर्या सत्रामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्रकाश कदम प्रसिद्ध वक्ते लेखक कोगनोळी हे लाभले होते. तसेच मा.प्रा.पी.डी.पाटील प्रसिद्ध व्याख्याते, गडहिंग्लज यांनी बदलते ग्रामीण जीवन या विषयावर ग्रामीण जीवन कसे बदलत चालले आहे आजची युवा मोबाईल चा सदुपयोग न करता दुरुपयोग करत चालली आहे. आजच्या युवा पिढीने आपली संस्कृती जपली पाहिजे. विधवा महिला यांना समाजामध्ये मान दिला पाहिजे. आजच्या युवा पिढीने समाजासाठी कार्य केले पाहिजे असे ते म्हणाले.  

  तिसऱ्या सत्राचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ एम पी पाटील. प्रसिद्ध प्रवचनकार साहित्यिक गोकुळ दूध संघ वरिष्ठ अधिकारी कोल्हापूर हे अध्यक्षस्थानी होते. सामाजिक, शैक्षणिक,कला, क्रिडा, साहित्यिक, क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणी लोकांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, कोल्हापूरी फेटा,मेडल, पेन देवुन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

  त्यानंतर मा.प्रमोदकुमार कुंभार  साहित्यिक, कथाकार कराड यांचा कथाकथनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

  कार्यक्रमास काकासाहेब पाटील माजी आमदार निपाणी,बाळासाहेब पाटील, संचालक, गुरुदत्त शुगर कारखाना टाकळीवाडी, राजेंद्र वड्डर माजी जिल्हा पंचायत सदस्य गळतगा, अशोक आरगे संचालक पी के पी एस, बेडकिहाळ, अशोक झेंडे ग्राम विकास अधिकारी बेडकिहाळ, प्रा. डी.एन.दाभाडे अध्यक्ष शेति विचार मंच, बेडकिहाळ, सुधाकर माने सामाजिक कार्यकर्ते निपाणी,राजु खिचडे मा.ग्रा पं अध्यक्ष कारदगा, महावीर पाटील सामाजिक कार्यकर्ते बेडकिहाळ, संजय पोतदार, अन्वर मुल्ला पत्रकार इचलकरंजी, उदय पांगिरे ज्येष्ठ पत्रकार बेडकिहाळ, बाळासाहेब शिंदे, संपत बोरगल, जीवन यादव, गजानन पाटील, यांच्यासह शेती विचार मंच  सर्व सदस्य,  तीन बत्ती चार रस्ता टेंपो संघटना इचलकरंजी, इचलकरंजी विद्यार्थी वाहतूक रिक्षा संघटना इचलकरंजी,भगत सिंग तरुण मंडळ कोल्हापूर, जिव्हेश्वर महिला भजनी मंडळ इचलकरंजी, शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, तसेच बेडकिहाळ व परिसरातील साहित्य प्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड.प्रिती हट्टीमणी यांनी केले. तर डॉ. नितीन गोंधळे यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post