महागाई, बेरोजगारी, NEET परिक्षेतील घोटाळे, खते-बियाणांचा काळाबाजार,

 कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांसंदर्भात महाभ्रष्ट भाजपा सरकार विरोधात

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे ‘चिखल फेको’ आंदोलन.



प्रेस मीडिया लाईव्ह : 


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे महाभ्रष्ट व निष्क्रिय भाजपा सरकारच्या विरोधात शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘चिखल फेको’ आंदोलन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरीकष्टकरीदलितअल्पसंख्याकमहिलातरूणगरिब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे. छत्रपती शिवाजी महाराजराजर्षी शाहू महाराजमहात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम या सरकारने केले आहे. मागील १० वर्षापासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खिळ घातली आहे. सरकारी नोकर भरती केली जात नाही. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीतह्या परीक्षा घेतल्या तर पेपरफुटीचे ग्रहण लागतेशेतकरी संकटात आहे पण त्यांना मदत दिली जात नाही. कांदाकापूससोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाहीसरकार एमएसपी देत नाही. कठिण काळात जनतेला मदत करण्याऐवजी सरकार जनतेचे शोषण आणि आर्थिक पिळवणूक करत आहे. NEET परिक्षेच्या पेपरफुटी व निकालातील गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य या सरकारने धोक्यात आणले आहे. पब संस्कृती व ड्रग्जचे तरूणांमध्ये वाढते प्रमाण, महागाईबेरोजगारीपेपरफुटीहिला सुरक्षाखतेबि-बियाणांचा काळाबाजारकर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूकचिखलात सुरु असलेली पोलीस भरतीराज्यातील सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत चालवलेली चालढकलश्रीमंताची मुले नशेमध्ये धुंद होऊन दिवसाढवळ्या गोरगरीब जनतेला गाडीखाली चिरडत आहे, राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था. मुलींचे दिवसाढवळ्या रस्त्यावर खून पाडले जात आहेत. सत्ताधारी पक्षाकडून जाती धर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या सरकारच्या विरोधात जनतेत तीव्र संताप असून सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही हे ‘चिखल फेको’ आंदोलन करीत आहोत.’’

यावेळी आमदार रविंद्र धंगेकर, माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, ॲड. अभय छाजेड, आबा बागुल, कमल व्‍यवहारे, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, चंदूशेठ कदम, अजित दरेकर, गोपाळ तिवारी, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, रफिक शेख, संगीता तिवारी, साहिल केदारी, राधिका मखामले, अक्षय माने, संतोष पाटोळे, सुजित यादव, दिलीप तुपे, रविंद्र माझिरे, हेमंत राजभोज, विशाल जाधव, रमेश सोनकांबळे, राजू ठोंबरे, अनिल पवार, मीरा शिंदे, शादरा वीर, सुंदरा ओव्‍हाळ, उषा राजगुरू, अर्चना शहा, वाल्मिक जगताप, प्रदिप पररेशी, सतीश पवार, द. स. पोळेकर, राज अंबिके, रवि ननावरे, राहुल तायडे, सुमित डांगी, सुरेश नांगरे, मुन्नाभाई शेख, अविनाश अडसूळ, रवि आरडे, विक्की खन्ना, मतिन शेख, क्लेमेंट लाजरस, भगवान कडू, अभिजीत महामुनी, नुर शेख आदींसह असंख्य काँग्रेसजण या आंदोलनास उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post