जंक फूडची आवड कमी करण्याची नितांत गरज



प्रेस मीडिया लाईव्ह :

गेल्या काही वर्षांत जंक फूड किंवा फास्ट फूड यांविषयीची आवड लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. यामध्ये युवक वर्गाचि प्रमाण लक्षणीय आहे. शाळकरी मुलांमध्येही हल्ली जंक फूडची विशेष क्रेज दिसून येते. लोकांची वाढती आवड लक्षात घेऊन श हरा सारख्या ठिकाणी प्रमुख मागांसह, बाजारपेठा, रेल्वे - बस स्थानके, शाळा महाविद्यालये यांसारख्या ठिकाणी जंक फूडचे स्टॉल्स मोठ्या प्रमाणात उभारले जाऊ लागले आहेत. या जंकफूडपैकीच एक असलेला शोर्मा नावाचा मांसाहारी पदार्थ आजमितीला अनेकांच्या आवडीची डिश बनला आहे. अनेकजण तो घरी बनवण्याचाही प्रयत्न करतात; मात्र रस्त्याच्या कड़ेला मिळणाऱ्या या पदार्थाची चव घरी बनवल्या जाणाऱ्या शोर्माला येत नाही असे मत खाद्य पदार्थाचि शौकीन व्यक्त करतात.

युवकांच्या जिभेचे चोचले पुरवणारा हाच शोर्मा आज अनेकांचे आरोग्य बिघडवणारा आणि काहींचे तर प्राण घेणारा ठरू लागला आहे. त्यामुळे कोणी जर हा रस्त्यालगतचा शोर्मा खात असेल तर त्यांनी सावध व्हायला हवे. मांसापासून बनवलेले पदार्थ उघड्यावर विकणे बेकायदेशीर असतानाही आज या नियमांची ठिकठिकाणी सरास पायमल्ली होताना दिसत आहे. २०२२ मध्ये केरळच्या कासारगोड येथे शोर्मा खाल्यामुळे ५८ जणांना विषबाधा झाली होती. त्यापैकी एका लहाान मुलीचा दरदैवी अंत झाला होता. या शोर्माचे नमुने तपासले असता त्यामध्ये बुरशी तयार झाल्याचे लक्षात आले. या बुरशीमुळेच खाणाच्यांना विषबाधा झाली होती. ही घटना घडल्यानंतर तामिळनाड्चे आरोग्यमंत्री सुब्रमन्यम यांनी लोकांना शोरमा न खाण्याचे आवाहन केले होते; मात्र लोकांनी त्याकड़े दर्लक्ष केले, आज देशभरात हा शोरमा शहरां सोबत ग्रामीण भागांतही विकला जात आहे. शोर्मा हे मध्यपूर्व भागातील लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. या पदार्थचा शोध तुर्की मध्ये लागल्याचे मानले जाते. ओटोमन साप्राज्या दरम्यान अरब प्रदेशातील लेव्हंट प्रदेशात पहिल्यांदा शोर्मा तयार केल्याचे मानले जाते. पारंपारिकरित्या हा पदार्थ कोकराच्या मांसापासून तयार करण्यात येत होता. कालांतराने चिकन, टर्की, गोमांस किंवा वासराचे मांस वापरण्यात येऊ लागले. भारतात विकला जाणारा शोर्मा चिकन पासून बनवला जातो असे मानले जात असले तरी यामध्ये कोणते मास वापरले जाते याबाबत कठेही खात्री केिली जात नाही. काही दिवसांपूर्वी चिकन मोमोजमध्ये कत्राचे मांस वापरण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे रस्त्यालगत मिळणाऱ्या शोर्मासाठी वापरण्यात येणाच्या मांसामध्येही अशा प्रकारची भेसळ केली जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०२३ मध्ये केरळातील एका युवकाचा शोर्मा खाल्यामुळे विषबाधा होऊन मृत्यू झाला होता. मानखुर्दमध्ये हल्लीच प्रथमेश घोक्षे नावाच्या तरुणाचा रस्त्यावरील  शोर्मा खाल्यामुळे विषबाधा युवकांना अटक करून गुन्हा नोंदवला. काही दिवसांपूर्वी गोरेगाव येथेही शोर्मातून १२ जणांना विषबाधा झाली.मासापासून बनवल्या जाणाच्या शोमां आणि मोमोजची रस्त्यालगत सर्रासपणे अवैध विक्री केली जात आहे. असे पदार्थ आरोग्याला हानीकारक असूनही स्थानिक प्रशासनाकडून त्यांवर कारवाई होत नाही. याविषयी आरोम्यमंत्री, तसेच अत्न आणि औषध प्रशासनमंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. अशा प्रकारे उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाच्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थानी कारवाई करावी आणि त्याचा अहवाल आरोग्य विभागाला पाठवावा. यामध्ये दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीमध्ये केली आहे.

२४ तासानंतर शोर्मा या पदार्थामध्ये मानवी प्रकृतीला हानीकारक द्रव्ये निर्माण होतात. त्यातील मांस कधीपर्यंत टिकाऊ आहे, याची कालमर्यांदा देण्यात येत नाही. कालबाह्य मांस खाल्ल्यामुळे त्यातून विषबाधा होण्याची शक्यता असते. शो्रमा खातांना त्यावर "मेयॉनीझ' हा पांढच्या रंगाचा 'साँस' वापरला जातो. अंड्यातील बलक वापरला जातो. तो योग्यरित्या साठवला जातो का , याविषयी शाश्वती नसते. मो मोजमध्ये वापरण्यাत येणारे 'आजोडिकाबोंनामाईड' आणि 'बेझॉईल परॉक्साईड' हे शरिरासाठी हानीकारक आहे. यातून मधुमेहासारखे विकार बळावत आहेत.या मुद्यांचा या तक्रारीमध्ये ठळकपणे उल्लेख आहे. अशा प्रकारे उघड्यावरील मांसाहारी खाद्य पदार्थोमुळे सामाजिक स्वास्थ्य वेठीस धरले जात आहे. त्यामुळ्े कुणाच्या तक्रारीची वाट न पहाता प्रशासनाने यावर स्वतःहन कारवाई करावी, अर्शी मागणी केली आहे. 

रस्त्यावरील स्टॉल्सवर खाद्यपदार्थ विकताना बच्याचदा स्वच्छता राखली जात नाही. मांसापासून बनवण्यात येणाच्या खाद्यपदार्थाच्या बाबतीत जी काळजी घेतली पाहिजे, मांस साठवण्यासाठी जी उपकरणे असायला हवीत ती रस्त्यावरील स्टॉल्सवर असतातच असे नव्हे. अशा ठिकाणी अधिक काळ मांस बाहेर राहिल्यामुळे त्यातून विषबाधा होण्याची शक्यता बळावते.

२०२२ मध्ये केरळमध्ये शोर्मा खाल्यामळे विषबाधा झाल्याची घटना घडल्यानंतर तामिळनाडुच्या आरोग्यमंत्र्यानी खाद्यपदार्थ विकणाच्या राज्यभरातील स्टॉल्सची तपासणी करण्याचे अदेश दिले होते. ज्या स्टॉल्सवर अन्नपदार्थ ठेवण्यासाठी आणि साठवण्यासाठी आवश्यक सुविधा नसतील अशा १००० स्टॉल्स आणि दुकानांवर यावेळी दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. आपल्याकडे अशा प्रकारची कारवाई केव्हा होणार? शाळकरी मुले आणि युवकांमध्ये दैनंदिन खाण्यात 'जंक फूड चे वाढते प्रमाण खरेतर चिंतेचा विषय आहे. जंक फूड च्या अतिसेवनाने शरीरातल्या इन्सुलिनची पातळी मर्यादिपेक्षा अधिक वाढते, व्यक्तीची प्रतिसाद देण्याची शक्ती हळूहळू मंदावू लागते. ह्दयविकार, मधुमेह, रक्तदाब यांसारखे आजार पूर्वी केवळ श्रीमंतांच्या घरात होते ते आज सामान्यांच्या घरापर्यंत पोहोचले आहेत. खाण्यातील 'जंक फूड' चा वापर हेसुद्धा या मागील एक कारण आहे. त्यामुळे लहान मुलासह युवकाम्धील जंक फूड्सप्रतीची क्रेज कमी करण्याची आज नितांत गरज निर्माण झाली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post