इचलकरंजी : समाजवादी प्रबोधिनी, लोकशाही वाचवा कृतीशील विचार मंच पलुस, श्नी समर्थ साहित्य,कला,क्रीडा व सांस्कृतिक युवा मंडळ पलुस व व्ही.वाय.(आबा) पाटील समाज प्रबोधन अँकँडमी नागराळे यांचे संयुक्त विद्दमाने पलुस येथे दि २८जानेवारी पासुन व्याख्यानमाला व कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
आचार्य शांताराम बापू गरुड जयंती व शहिद कॉ.गोविंद पानसरे शहिद दिनानिमित्त होणा-या आचार्य शांतारामबापू गरुड व्याख्यानमालेत पहिले व्याख्यान गुरुवार दि. २८ जानेवारी २०२१ रोजी " नवे शैक्षणिक धोरण २०२०" या विषयावर मा. प्रसाद कुलकर्णी यांचे व्याख्यान झाले.
शुक्रवार दि. २९ जानेवारी रोजी कॉ. मारुती शिरतोडे यांचे " आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक जीवन कार्य " या विषयावर व्याख्यान होणार आहे. शनिवार दि.३० जानेवारी मा. अँड. के.डी.शिंदे यांचे "दिल्लीतील शेतकरी अंदोलन व शेतकरी कामगार विरोधी कायदे" या विषयावर व्याख्यान होणार आहे.
ही व्याख्यानमाला आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र, डॉ.अमोल पवार, श्नी धोंडाराज महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्या. पलुस यांच्या सौजन्याने होत आहे.
रविवार दि. ३१ जानेवारी रोजी श्नी समर्थ साहित्य,कला,क्रीडा व सांस्कृतिक युवा मंडळ पलुस यांचे वतीने दुपारी १.०० वा १८ वे परिवर्तन साहित्य संमेलन अंतर्गत "कवी संमेलन"आयोजित केले आहे. कवी संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिध्द कथाकथनकार मा. विश्वनाथ गायकवाड, (विटा) हे असुन उद्घाटक कथाकथनकार मा. हिम्मत पाटील (नागठाणे )व स्वागताध्यक्ष कवी संदिप नाझरे (आमणापुर )हे आहेत अशी माहीती संयोजक समितीच्या वतीने व्ही.वाय.(आबा) पाटील, कवी किरण शिंदे, डॉ.अमोल पवार, कवी संदीप नाझरे, प्रा. रविंद्र येवले, संजीव तोडकर, कुमार गायकवाड, जयवंत मोहिते,जितेंद्र कांबळे,माधवी शिंदे, सुनिता कोळी यांनी केले आहे.
टिप:- हे सर्व कार्यक्रम कामगार भवन , रामानंदनगर येथे होतील.सर्व उपस्थितांनी मास्क वापरने बंधनकारक राहिल.
---------------------------------------------------------------- ----