पुणे दहा दिवसाच्या लॉक डाऊन करून किती फरक पडला.? प्रशासनाला संसर्गाची साखळी तोडण्यात यश आले का...?

दहा दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये
खरंच प्रशासनाला संसर्गाची साखळी तोडण्यात यश  आलय का...?


PRESS MEDIA LIVE :  पुणे : (मोहम्मद जावेद मौला ) :

पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे पुण्यात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. पण आता लॉकडाउन संपल्यानंतरची आकडेवारी समोर आली आहे. दहा दिवस लादलेल्या लॉकडाउनमध्ये नेमकं काय झालं? खरंच प्रशासनाला संसर्गाची साखळी तोडण्यात यश आलंय का? रूग्णसंख्येवर आवर घालण शक्य झालंय का ? या सगळ्या प्रश्नाची उत्तर नाही अशी आहेत. लॉकडाउन सुरू झाला तेव्हा ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या 9409 होती. तर 874 मृतांचा आकडा होता. 10 दिवसांच्या लॉकडाउनमध्ये ॲक्टिव्ह रूग्णसंख्या तब्बल17,056 आणि 1104 मृत्यू झाले. त्यामुळे आकडे वाढायचे थांबत नाही. तसंच. 10 दिवसाच्या लॉकडाऊननंतर ही पुण्यात रुग्णसंख्येत होणारी वाढ थांबली नसून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 9 दिवसांवरपूर्वी हा कालावधी 29 दिवस होता. रुग्णवाढीमुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही घटले आहे. ते 16 ते 21 जुलै दरम्यान 45.9 टक्क्यांवर आले आहे. हेच प्रमाण 9 ते 15 जुलै दरम्यान 71.9 टक्के इतकं होतं तर 2 ते 8 जुलै दरम्यान 65.3 टक्के होतं. मात्र पूर्ण जिल्ह्याचा विचार करता मृत्यू दर कमी झाला आणि देशाचा,राज्याचा, मुंबईचा विचार करता सर्वात कमी मृत्यू दर पुण्याचा आहे. देशातील मृत्यू दर 2.41आहे तर पुणे जिल्ह्याचा 2.35 आहे.

राज्याचा 3.75 टक्के तर मुंबईचा 5.61 टक्के इतका आहे. यावरून लॉकडाउन कालावधीत कोरोनाबाधितांची संख्या वाढलेली दिसत असली तरी याचं एक महत्त्वाचं कारण वाढलेल्या चाचण्या आहे. तसंच रुग्णांवर वेळेवर उपचार होत असल्याने मृत्यदरही कमी झाला आहे. लॉकडाउनमुळे रुग्ण संख्या घडेल हा दावा मात्र, फोल ठरला आहे. कोरोनाच्या काळात धक्कादायक आला समोर, 50 मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार

     दरम्यान, पिंपरी आणि थेरगाव परिसरात घोषित करण्यात आलेल्या कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्य सेवेची दुकानं 8 ते दुपारी 12 पर्यंतच उघडी असणार आहेत. तसंच कंटेन्मेंट झोनमध्ये नागरिकांच्या मुक्त वावरावर निर्बंध असतील हा आदेश आज मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत लागू असेल अशी माहिती सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊन जरी संपला असला तरी 31 जुलैपर्यंत पुणेकरांना नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. दरम्यान, पुढील शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन ठेवा, व्यापाऱ्यांनी केलेल्या या मागणीवर प्रशासन विचार करत असल्याचं पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितलं आहे.

पिंपरी आणि थेरगाव परिसरात फक्त 4 तास उघडणार दुकानं तसंच कंटेन्मेंट झोनमध्ये नागरिकांच्या मुक्त वावरावर निर्बंध असतील हा आदेश आज मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत लागू असेल अशी माहिती सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊन जरी संपला असला तरी 31 जुलैपर्यंत पुणेकरांना नियमांचं पालन करणं आवश्यक आहे.

दरम्यान, पुढील शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन ठेवा, व्यापाऱ्यांनी केलेल्या या मागणीवर प्रशासन विचार करत असल्याचं पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितलं आहे. आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post